
अकोला: अंकुर साहित्य संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय अरविंद भोंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त श्रद्धांजलीपर हास्य कवि संमेलनाचा कार्यक्रम जानोरकर मंगल कार्यालय कौलखेड अकोला येथे संपन्न झाला.
श्रद्धांजलीपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक अंकुर साहित्य संघाचे माजी केंद्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोदजी काकडे होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थनेतून डॉ. रामेश्वरदादा बरगट यांनी केली. तेव्हा विचारमंचावर माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजयजी खडसे, डॉ. प्रमोद जी काकडे अंकुर साहित्य संघ माजी केंद्रीय अध्यक्ष अंकुर राजमाता शीलाताई गहीलोत, डॉ.श्रीकांत काळे,नगरसेविका योगीताताई पावसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष श्री तुळशीरामजी बोबडे यांनी केले. प्रास्तविकातून स्व अरविंद भोंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सांगत भोंडे जरी हास्य सम्राट असले तरी त्यांची लुगडं नावाची रचनाही माणसाला अक्षरशः रडवते.. भोंडे साहेबांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुर साहित्य संघाचे सुप्रसिद्ध गझलकार अमोल गोंडचवर यांनी केले.
श्रद्धांजलीपर संवेदनेत आ.माजी राज्य मंत्री गुलाबरावजी गावंडे, समाजसेवी व्यक्तिमत्व प्रा. डॉ. संतोषजी हुसे,
निवासी उपजिल्हाधिकारी आ प्रा.संजय खडसे यांनी विचार व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपीय संवेदनात डॉ. प्रमोद काकडे अंकुर साहित्य संघाच्या पुरस्काराची घोषणा केली. नंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली याचा आनंद घेण्यासाठी रसिकांची तुफान गर्दी उसळली होती.
कवी संमेलनात कविवर्य मनोजजी मद्रासी,अनंत राऊत, सुचिताताई खुळे , हिम्मत ढाळे प्रशांत भोंडेना अंकुर साहित्य संघाचे हास्य कवी धीरज चावरे आदी कवींचा समावेश होतो. कवी संमेलना च्या सूत्रसंचालनाची सूत्रं हिम्मतजी ढाळे आणि सुचिता ताई खुळे यांनी सांभाळले.
सुरुवातीला हास्य कवी प्रशांत भोंडे यांनी हास्याचे तुषार सिंचन करून त्यांचे फवारे उडवित.. श्रोत्यांमध्ये हास्य फुलवून सुरुवात केली.. जायेल केसही रचना सादर केली.. टीव्ही स्टार मनोज मद्रासी यांनी हिंदीतून अनेक चुटकुले आणि व्यंगात्मक रचना सादर करून उपस्थित रसिकांमध्ये हास्यांचा गडगडाट केला. आपले वऱ्हाडचे सुपुत्र पुणे निवासी अनंत राऊत यांनी यांनी राजकीय समाजव्यवस्थेवर घणाघाती प्रहार केला. भोंगा वाजला ही रचना सादर करून अक्षरशा रसिकांच्या डोळ्यात जणू झणझणीत अंजन घातलं. रसिकांच्या मागणीवरून त्यांची महाराष्ट्रभर गाजलेली मित्र वणव्यामध्ये ही कविता सादर् करण्याची विनंती केली.
या कार्यक्रमाला अनेक राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळींनी रसिक म्हणून हजेरी लावली. अंकुर साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी स्व.भोंडे साहेबांचे चिरंजीव धीरज भोंडे यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.