
पुण्याची अर्चना वाघमारे प्रथम तर अकोल्याचा विशाल नंदागवळी द्वितीय
चंद्रपुर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच आभासी पद्धतीने जाहीर झाला असून यामध्ये पुण्याची अर्चना वाघमारे प्रथम, अकोल्याचा विशाल नंदागवळी द्वितीय तर पल्लवी रामटेके (चंद्रपुर) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ही १५-३५ वयोगटातील तरुणांसाठी होती. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणीहुन एकूण १३० निबंध प्राप्त झालेत. या स्पर्धेमध्ये प्रोत्साहनपर क्रमांक सुप्रिया विकल्प तेलतुंबडे (चंद्रपुर), कल्पेश आत्माराम पारधी (रत्नागिरी), कोमल मधुकर चनमेनवार (चंद्रपुर), रेवती नितीन लिंगे (नागपूर), मयुरी रुषी मांडवगडे (गडचिरोली) आणि विशेष प्रोत्साहन क्रमांक अनुराधा रागीट (गोंडपिपरी) यांना देण्यात आला.निबंध स्पर्धेसाठी लोकशाहीच्या नजरेतून अमृत महोत्सवाचे रंग, रक्षा तुझी नी माझी हे संविधान करते, वर्तमान राजकीय स्थिती आणि देशाचे भविष्य, राष्ट्रउभारणीमध्ये युवकांचे योगदान आणि आधुनिक पिढीला सोसेना सोशल मीडिया असे एकूण पाच विषय ठेवण्यात आले होते. निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून उमेश पारखी, रमेश बुरबुरे, डॉ. श्रीकांत पानघाटे, अरुण झगडकर आणि विशाल शेंडे यांनी जबाबदारी पार पाडली.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ असे बक्षिसाचे स्वरूप असून पुरस्कार प्राप्त स्पर्धकांना लवकरच बक्षिस पाठविण्यात येईल अशी माहिती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुरज पी दहागावकर यांनी दिली. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव मुन्ना तावाडे, कोषाध्यक्ष दिनेश मंडपे, उपाध्यक्ष सिद्धार्थ दहागावकर, सदस्य तृप्ती साव, स्पर्धा संयोजक प्रलय म्हशाखेत्री, श्याम म्हशाखेत्री, नैना घुगुस्कर, करिष्मा खोब्रागडे यांनी विशेष सहकार्य केले.