
स्थानिक – अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग, मानव्यविद्या शाखा आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठीतील थोर साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य तथा आरडीजी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. रवींद्र मुंद्रे हे होते. कार्यक्रमाला प्रमुखवक्ते म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. आनंदा काळे हे होते. तर प्रमुख उपस्थितामध्ये मानव्यविद्या शाखा प्रमुख डॉ.जीवन पवार, डॉ. इतिहास विभाग प्रमुख नानासाहेब वानखडे, मराठी विभाग प्रमुख डॉ.सुलभा खर्चे, डॉ.संजय पोहरे, डॉ.चेतन राउत, प्रा.सुनील मावस्कर, प्रा.संतोष पस्तापुरे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजय पोहरे यांनी केले तर प्रमुख पाहूणे डॉ.मुंद्रे यांनी मराठी भाषेच्या दर बारा कोसावर बदलत जाणाऱ्या लकबीवर लक्ष केंद्रित केले व बोली भाषा हे प्रमाण भाषेला चैतन्य पूरविणाऱ्या असतात, त्यांचे जतन व संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.कुलट सरांनी विद्यार्थांनी बोली भाषेसोबत प्रमाण भाषा, प्रमाण भाषेचे लेखन विषयक नियम अंगीकृत करावेत. मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी मराठीमध्ये संवाद करणे, लेखन करणे क्रमप्राप्त असल्याचे नमूद केले. ज्ञान हे आपल्या ठिकाणी कायम आहे. फक्त ते समजण्यासाठी आपल्या मातृभाषेचा वापर झाल्यास ते अधिक चांगल्याप्रकारे पोहचू शकते. त्यासाठी आपण मराठी मातृभाषेचा अभिमान बाळगावा व लेखन, वाचन, आणि संवाद आपल्या भाषेतून करावे असे मार्गर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते डॉ.आनंदा काळे यांनी आपल्या कवितेतून मराठी भाषेच्या गौरव मांडला आणि श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन बी.ए.भाग १ ची विद्यार्थींनी कु.मयुरी वाहाणे हिने केले तर आभार प्रदर्शन प्रा.गणेश मेनकार यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.