
अकोलखेड येथे संत रविदास महाराज जयंती साजरी
चर्मकार समाजातर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार
दिनांक ५ फेब्रुवारी:-
‘मन चंगा तो कठोती मै गंगा’ असा जगाला विचार देणारे संत रविदास महाराज यांचे विचार देशाला नवी दिशा देणारे अशी प्रतिपादन प्रमुख वक्ता म्हणून बोलताना आशिष गव्हाळे यांनी केले.संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण गाठेकर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून गावचे नवनिर्वाचित सरपंच दिगंबर पिंप्राळे व उपसरपंच निलेश झाडे, सोसायटीचे अध्यक्ष दादाराव तायडे, उपाध्यक्ष गजानन ताडे,ग्रामपंचायत सदस्य दिनेश गाठेकर, गोपाल भोरखडे, कलीम सौदागर, मदन सावळे, घनश्याम बिजने, अ. जहिद अ. शाहिद. सदस्या प्रमिलाताई शिरसाट, प्रीतीताई रंदे, पार्वतीताई पदमने व गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज यांच्या फोटो पूजनाने झाली , त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य व सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा हस्ते करण्यात आला. यानंतर प्रमुख वक्ते म्हणून आशिष गव्हाळे यांनी संत रविदास महाराज यांचे विचार मांडले त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक राधेश्याम झाडे यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला व कार्यक्रमाचे मार्गदर्शन व नवनियुक्त सरपंच दिगंबर पिंप्राळे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच केशवराव लांडे व आभार दुर्गा तायडे यांनी मानले.कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी मंगेश देउळकर, विशाल खंडारे, प्रतीक देउळकर, प्रवीण गाठेकर, प्रमोद खंडारे, कार्तिक पदमने, मंगेश खंडारे, ज्ञानेश्वर देउळकर, गोपाल खंडारे, शंकर पदमने, दिनेश गाठेकर (ग्रा.पं. सदस्य), प्रदीप शेगोकार, राहुल देऊलकर, शुभम रोजतकर, अमोल पदमने, प्रज्वल रोठे, शुभम शेगोकार, आदींनी अथक परिश्रम घेतले.