
मातंग समाज बांधवांचा जल्लोष
स्थानिक:
तेल्हारा तालुक्यातील अकोली रूपराव येथे अनेक वर्षापासून मातंग समाजाने स्व राखीव केलेला- अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासाठी असलेला भूखंड- येथील स्थानिक राजकारणाच्या दबावामुळे प्रलंबित होता. अनेक वर्षापासून या समाज मंदिराच्या जागेसाठी संघर्ष करत होते. परंतु आज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गजानन तायडे यांनी पुढाकार घेऊन, ऍड संतोष रहाटे सर, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, पश्चिम विदर्भ महासचिव बाल मुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्याकडे बाजू मांडली. या सर्वांनी विशेष दखल घेऊन मातंग समाजाची भक्कमपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे बाजू मांडली.
आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी- दोन गुंठे जाग्यासह- समाज कल्याण सभापतींना तात्काळ आदेश देऊन सर्वप्रथम मातंग समाजाचे समाज मंदिर बांधून द्या असे आदेश केले. म्हणून आज रोजी अकोली रुपराव व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्व मातंग समाजातील प्रमुख मंडळी यशवंत भवन येथे डफळ्याच्या गजरात साहेबांचे जयघोष करून आभार व्यक्त केले.
विशेष म्हणजे -अकोली रुपराव येथील मातंग समाजाने घेतली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहण्याची शपथ घेतली. मातंग कार्यकर्ते म्हणतात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने समाज कल्याण निधीच्या वाटपाची सुरुवात सर्वप्रथम मातंग समाजाला देऊन होत आहे, याची मातंग समाजाच्या पुस्तकात विशेष नोंद असेल.
यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तथा मातंग समाज नेते गजानन तायडे यांनी पुढाकार घेऊन वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अॅड. संतोष राहाटे, बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासोबत सदर बाबीसंदर्भात चर्चा केली असता मातंग समाज बांधवांचा असलेला संघर्षाचा विचार करुन अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभापतींना रखडलेली दोन गुंठे जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहासाठी देण्याचे आदेश दिले. यासाठी गुरुवारी अकोली रुपराव येथील मातंग समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी मातंग समाजाचे युवा अध्यक्ष सागर तायडे, मोहन अंजनकर, विनायक तायडे, कृष्णा तायडे, ओम तायडे, युवराज तायडे, आकाश तायडे, वेदांत तायडे, गोपाल नावकर, संतोष खंडारे यांच्यासह उपसरपंच लक्ष्मण सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सागर लासुकर, त्र्यंबक तायडे, मातंग समाज नेते गजानन तायडे, गजानन दांडगे, संजय बोदळे, प्रभाकर बोरकर, मोहन अंजनकर, गंगाधर सावळे, मातंग समाजाच्या नेत्या मयुरी मोरे, गोपाल अंजनकर आदी समाजबांधव उपस्थित होते.